Posts

मी बाप्पा बोलतोय

प्रिय भक्तांनो, प्रत्येक वर्षी जेव्हा तुम्ही मला आपल्या घरी, गल्लीत, मंडपात आणता तेव्हा माझे हृदय आनंदाने भरून जाते. घराघरांतून येणारा "गणपती बाप्पा मोरया" हा जयघोष होताच मला तुमच्या प्रेमाची प्रचिती येते.  मी मूर्तीमध्ये असलो तरी प्रत्यक्षात तुमच्या हृदयात वास करतो. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यात, छोट्या मुलांच्या किलबिलाटात, स्त्रियांच्या आरतीत, तरुणांच्या उत्साहात आणि वृद्धांच्या भक्तीत मी स्वतःला अनुभवतो. दहा दिवसात तुम्ही मला फुलं, नैवेद्य, मोदक अर्पण करता; पण मला खरा आनंद तुमच्या हृदयातील श्रद्धा, निरागस प्रेम आणि निर्मळ भावनेतून मिळतो. तुमची आरती करताना तुमच्या डोळ्यांत चमकणारे भाव पाहून मला वाटते की, माझे आगमन खऱ्या अर्थाने यशस्वी झाले..   मला प्रेमाने घरी आणता, पण कधी कधी त्या आनंदोत्सवात विसरता की माझे खरे रूप म्हणजे ज्ञान, सद्गुण, शांतता आणि समत्व. दगडामध्ये, मातीमध्ये किंवा शाडूमध्ये मी मर्यादित नाही; मी सृष्टीच्या कणाकणात आहे.मी तुमच्या प्रार्थना ऐकतो, अश्रू पाहतो, तुमच्या मनातील भीती आणि चिंता जाणतो, जोडलेला प्रत्येक हात आणि आणि त्यामाघची भावना ही मला ठाऊक आहे....

तटस्थ!

Image
  🚩 हजारो सुखा-दुःखांनी आयुष्य घडत असतं आणि हे सारं नियतीने अगोदरच ठरवलेलं असतं. माणूस संघर्षानेचं घडत असतो आणि ज्याला अपयश अथवा अडचणी नाही तो घडणार कसा..बरोबर ना..या साऱ्या गोष्टींवर मात करून स्वतःला सावरत अजून मजबूत बनवणं हे आपलं कर्तव्य आहे कारण घडलं नाही की पडलंच!    संघर्षाचं सर्वात मोठं उदाहरण जणू काय तर आजही हजारो वर्षांनंतर देखील तटस्थ असणारा सह्याद्री! पहायला गेलं तर डोंगर आणि दरी हे निर्जीव आहेत पण यांनी जे सहन केलं ते करायची धमक आणि विचार करण्याची क्षमता सुद्धा कोणाकडेही असेल असं खडकावून सांगू शकतो.. साक्षात महादेवाचं रूप श्रीमंत छत्रपती श्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे पाऊलं पडलेली पावनभूमी, देवीदेवतांची जयघोष, गडगंज तोफा, लाखो मावळ्यांच्या आणि शत्रूंच्या रक्तरंजित लढाईनंतर पडलेला रक्ताचा सडा, अश्रूंचा पूर आणि बरंच काही... एवढं काही होऊनही हा सह्याद्री अजूनही तटस्थ उभा आहे आणि यामुळेच स्वराज्य आणि महाराष्ट्र घडला आहे....🚩❤️ असंच काहीसं आपणही घडावं...!

जयघोष चाले तुझा मोरया! 🙏🏻🚩

Image
         अगदी लहान असताना आजीच्या आणि आईच्या गोष्टींच्या माध्यमातून परिचयात आलेला पहिला देव म्हणजे गणपती बाप्पा. याचं गोष्टींच्या माध्यमातून बाप्पा कधी आपल्या मनावर अधिराज्य गाजवून स्वतःची वेगळीच छाप सोडत प्रत्येक भक्ताच्या अडीअडचणीत पाठीशी कायम उभा असतो हे सर्वांना ठाऊक आहे. गणेशोत्सवाची वाट अगदी  लहाण्यापासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण आतुरतेनं पाहत असतो कारण गणरायाच्या आगमनाने मिळणारी स्फूर्ती, ऊर्जा ही कायम पाठबळ देत असते. गणेशोत्सव म्हणलं की पहिलं नाव आठवतं ते मुंबई आणि नंतर पुणे. या सुरेख बाप्पांना पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी पहायला मिळते. गणेशोत्सव सर्वच ठिकाणचे  पाहण्यासाखेचं असतात परंतु मुंबई आणि पुण्यातील गणेशोत्सवाची गोष्टच निराळी. भव्य-दिव्य फुलांची आरास, कमीतकमी 20 फुटांची बाप्पाची मूर्ती, बाप्पाच्या मूर्तीवर अप्रतिम दागिने, चहुबाजूस विद्युत रोषणाई, विशाल देखावा, कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि  मंडळात कार्यरत असलेले हजारो स्वयंसेवक ही बाब नवल करण्यासारखीचं! मुंबई मधील मानाच्या गणपतींपैकी मुंबईचा राजा म्हणजेच गणेश ...

वारी चैतन्याची!!

Image
वारी चैतन्याची.. वारी विठ्ठलाची.. वारी पंढरीची.. वारी भेटीच्या ओढीची...     हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी आषाढी एकादशी हा एक मोठा सण होय. संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास महिन्याभरापूर्वीच या उत्सवाची तयार सुरू होते आणि हा उत्सव प्रत्येक भक्ताच्या मनात इतका रुजलेला आहे की लहान मुलापासून ते महाताऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण हा आपापल्या भक्तीने साजरा करतो कारण विठ्ठल हा साऱ्या जगाचा माय-बाप.... ''जगण्याचा पाया आणि चालण्याचे बळ'' असं विठ्ठलास संबोधल्या जातं कारण संपूर्ण महाराष्ट्राचं स्फूर्तिस्थान आहे पंढरपूर आणि विठ्ठल. दरवर्षी लाखो भाविक पंढरपूराच्या दिशेने पायी वाटचाल पालखीच्या माध्यमातून करत असतात मग त्यात लहान मुलं, युवक वर्ग, पुरुष आणि महिला आणि वृद्ध सुद्धा असतात हे काही नवल नाही. वारकऱ्यांना ओढ असते ती विठ्ठलाच्या दर्शनाची, त्याच्या चरणाला स्पर्श करण्याची कारण प्रत्येक अडचणीचं मोक्ष तिथंच!  पायी चालणं ते पण कुठल्याही गोष्टीच भान न ठेवता, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन हे प्रत्येकाच्या हाताचा खेळ नाही त्यासाठी लागते ती निस्सीम भक्ती आणि मनोभावी श्र...

ट्रेकिंग!

Image
इतक्या दिवसांच्या विश्रांतीनंतर सहजच पुण्याला येण्याचा योग्य आला आणि मग काय इथलं वातावरण पाहून मन चलबिचल तर होणार हे साहजिकच!  अलगद पडलेली धुक्याची चादर, रिमझिम रिमझिम पावसाची चाहूल, चहुबाजूंनी उंच डोंगर-दऱ्या, माणसांची झुंबड अन रम्य वातावरण हीच खरी ओळख पुण्याच्या पावसाळ्याची.... मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर डाव्या बाजूला घोराडेश्वर म्हणून महादेवाचं उंच डोंगरावर गुफेत वसलेलं मंदिर आणि ट्रेकिंग साठी हे खूप सुंदर ठिकाण आहे. पर्यटकांसाठी हे ठिकाण म्हणजे जणू काय सुंदर पर्वणीच! खालपासून जवळपास 1000 पायऱ्या, चालताना चढ-उतार, उंच टोकाला जाईपर्यंत श्वासाची होणारी धडधड, जसं जसं वर चढताल तसं तसं वाढणारा प्रचंड उत्साह, वरती पोहचल्यावर गुफेत महादेवाची स्वयंभू पिंड, आजूबाजूला छोटं-छोटे तलाव, नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ, फोटो काढण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण अन हे सर्व पाहता आठवते ती फक्त निसर्गाची किमया... ज्याप्रमाणे छोटंसं वर्णन मी लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे मला सुद्धा तिथे गेल्यावर फोटो काढायचा आणि डोंगरावर चढायचा मोह आवरला नाही आणि त्यातूनच हा नकळत काढलेला फोटो... मन तृप्तच !!

कोरोना बस करो ना ....

Image
एक वर्षापेक्षा सुद्धा जास्त लोटला गेला असून अजूनही कोरोनाचा तांडव भारतात चालूच आहे. कधीही न विचारात आलेले शब्द आज अनुभवायला मिळत आहेत. अचानकपणे आलेलं महामारीचं संकट केव्हा टळेल हे काही सांगता येत नाहीये कारण जागतिक आरोग्य संघटना आणि भारतातील तज्ञ डॉक्टर तिसरी आणि चौथी लाट येईल हे सांगत आहेत आणि सध्या चालू असलेल्या दुसऱ्या लाटेमुळे होत असलेला मृत्यूचा तांडव पाहता तिसऱ्या आणि चौथ्या लाटेचा हाहाकार काय असेल??  बऱ्याच दिवसानंतर " कोरोना बस करो ना  " हा लेख लिहीत आहे आणि लिहिण्याचं मुख्य कारण म्हणजे आरोग्य व्यवस्थेचा होत असलेला बाजार आणि त्याची दुरवस्था!!  सध्याची परिस्थिती अजूनही पाहता अजूनही हाताबाहेर असल्याचं दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं कारण प्रत्येक जण आपापल्या नातेवाईकांना वाचण्यासाठी जिवाचं रान करत आहे. काही महिन्यांपूर्वी रुग्णांची आकडेवारी थोडी फार कमी झाली होती मात्र ते कळताच नागरिकांनी निष्काळजीपणे बाहेर विना मास्क, सोशल डिस्टनसिंग आणि सॅनिटायझर वापरताच फिरायला सुरुवात केली आणि आता आपण पुन्हा त्याच वळणावर आहोत असं काहीसं अनुभवायला मिळत आहे. आपल्या देशातील ...

नातं मित्रत्वाचं

Image
...मी आहे ना या उद्गाराच्या सुरुवातीपासून विश्वासाच्या एका वेगळ्याच नात्याची सुरुवात होते. वाचक रसिकांना आणि मित्रांना नक्कीच प्रश्न पडला असेल की नवीन लेख आहे तरी काय आणि त्याचा विषय काय? हो याचं उत्तर म्हणजे नातं मित्रत्वाचं आणि लिहण्याचा कारण म्हणजे विश्वासाने आणि आपुलकीने तयार झालेलं नातं म्हणजे मित्र.... चला मग आता मुख्य मुद्दा लिहायला सुरुवात करू.. आपण जन्माला येतो आणि आपल्या परिवारात मोठे होतो वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली घडत जातो त्याचप्रमाणे मित्रांच्या सानिध्यात सुद्धा घडत असतो. आता हे मित्र होतात कशे ? हो सांगतो बालपणी शाळेत गेल्यानंतर कुठलाही मुलगा किंवा मुलगी आपल्या ओळखीचे नसते हळू-हळू गप्पा-गोष्टी रंगल्यानंतर आपण त्यांना आपलं मानायला लागतो आणि तोच अज्ञात मुलगा आपला मित्र होतो. आता शिक्षणाचा नवीन टप्पा येतो तो म्हणजे शाळा. शाळेत गेल्यानंतर सुद्धा अनेक अज्ञात मुलं मित्र बनतात आणि काही दिवसांच्या सोबतीनंतर अत्यंत विश्वासू आणि जिगरी यार होतात. अशाच काही मित्रांची मिळून टोळी (गॅंग) तयार होते आणि कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडणार नाहीत अशी वचने एकम...